आम्ही जिंकतोय की हरतोय?
 पुष्कराज चव्हाण मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच पार पडली. निवडणुकीचा निकाल २३ फेब्रुवारी २०१७ रोजी जाहीर झाला आणि त्यादरम्यान उडालेला धुरळा आताशी कुठे निवतोय. आता सत्ता समीकरणं जुळवण्यात सर्वपक्षीय मंडळी गुंतलेली असताना समाज माध्यमांवर आजही मार्मिक किस्से, चुटकुले आणि कोपरखळ्यांच्या संदेशांची देवाण घेवाण चालूच आहे. यातच एक संदेश विचारांना चालना देऊन गेला. यात मुंबई महानगर पालिकेत निवडून आलेल्या ५५ ते ६० परप्रांतीय उमेदवारांच्या नावांची यादी होती. आणि ती यादी वाचल्यावर भविष्यात उभ्या ठाकलेल्या धोक्याची जाणीव झाली. एकूण २२७ नगरसेवकांपैकी ५५ ते ६० नगरसेवक परप्रांतीय? म्हणजे २५% हून जास्त परप्रांतीय नगरसेवक? मनात एकच प्रश्न आला की आम्ही जिंकतोय कि हरतोय? आजच्या पिढीला कदाचित महाराष्ट्र राज्य निर्मितीची पार्श्वभूमी माहिती नसेल किंवा हुतात्मा स्मारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे शब्द कानावर पडले असले तरी त्याविषयीची माहिती आधीच्या पिढीकडून त्यांना कदाचित दिली गेली नसेल. आपल्या प्रांताविषयी भाषिक, सांस्कृतिक अस्मिता नवीन पिढीमधे जागवणे ही खरं तर आधीच्य...