Posts

Showing posts from April, 2020

आंबेवाडीची गोष्ट.

              आंबेवाडीची गोष्ट        सरत्या वैशाखाची भल्या पहाटेची वेळ होती. आंबेवाडी गांव चांदण्या उत्तररात्रीच्या चंदेरी चंद्रप्रकाशात न्हाऊन निघत होतं.सारं गाव अगदी निपचित गडद निजलेलं होतं. ग्रीष्माला परतीचे वेध लागलेले. हवेत वर्षा ऋतुचं आगमन होणार असल्याची जाणीव करुन देणारा सुखद गारवा होता. चतुर्थीचा चंद्र मावळतीकडे झुकत चाललेला. चंद्राच्या चंदेरी प्रकाशात झाडांच्या सावल्या लांबट होत चाललेल्या. झाडांच्या पानां मधून पिठुर चांदणं झिरपत होतं. पानांच्या सावल्यांची जाळी रस्त्यावर पसरलेली होती. झाडं मंद वाऱ्याच्या झुळुकीने संथपणे डोलत होती. आळसावलेली कुत्री मांजरी अंगाचं मुटकुळं करुन गार वाऱ्याच्या झुळुका अंगावर घेत धुळीत झोपलेली. ऊशाशी धूसर दिसणारा पन्हाळ्याचा डोंगर, डाव्या कुशीला जोतिबाचा डोंगर आणि पायाशी संथ वाहणाऱ्या पंचगंगा नदीचं पात्र घेऊन विस्तीर्ण हिरवंगार ऊसाचं शेत वाऱ्यावर डौलाने डोलत ऊभं राहीलं होतं. शिवारात दौलतराव भोसल्यांचं दगडी जोत्यावर बांधलेलं ऐसपैस दुमजली कौलारु घर. घरापुढे अंगणात दगडी तुळशी वृंदावन, त्यावर तेल...

कोरानाच्या निमित्ताने

कोरोनाच्या निमित्ताने आज अचानक माझा वर्गमित्र संतोष रांगणेकर कडून आम्हा काही जणांना आपण झूम ऍपवर मिटिंग करायची का म्हणून विचारणा झाली आणि आम्ही आठ दहा जण ऍप डाऊनलोड करुन एकमेकांना भेटलो आणि तासभर मस्त गप्पा मारल्या आणि हसलो खिदळलो. एकतर आम्हाला प्रत्यक्ष भेटून बरेच दिवस झाले होते आणि गेले १२-१५ दिवस आम्ही सारेच मोकळे घरात सक्तीने बसलेलो होतो त्यात ही भेट खरोखर ताजे तवाने करणारी ठरली आणि अखेरीस बरं वाटलं, खूप दिवसांनी भेटलो, खूप दिवसांनी हसलो मजा आली आता परत असंच भेटूया असं म्हणत एकमेकांचा निरोप घेतला. दरम्यान गप्पांमधे संतोषने सर्वांना विचारलं की सध्यस्थिती विषयी तुमची मतं काय आहेत ती मांडा. त्यात मला रश्मीचं एक वाक्य लक्षात राहीलं की निसर्गाने मानवाला दाखवून दिलंय की तुम्ही कितीही उड्या मारा, प्रगती करा पण शेवटी तुमचा जन्म आणि मृत्यू हे माझ्याच हातात आहे. खरंच, चीन मधून कोरोना या जीवघेण्या विषाणूचा प्रसार जगभरात झाला आणि हाहाःकार माजला. जगभरात महामारी सुरु झाली आणि सगळ्यांचं धाबं दणाणलं. भल्या भल्या देशांची भंबेरी उडाली, पांचावर धारण बसली. शेकडोंनी आणि हजारांनी माणसं पटापट मर...

मिरजेचे गेस्ट हाऊस.

मिरजेचे गेस्टहाऊस कॉलेज मधे असताना पासूनच मी काही ना काही ऊद्योग केले आणि सोडून ही दिले. त्यापैकी एक सरकार मान्य देशी दारुच्या डिस्ट्रिब्युटरचा आणि दुसरा टुरिस्ट टॉक्सिचा धंदा होता. या दोन्ही धंद्याच्या कामांच्या निमित्ताने सतत परगावी प्रवास करावा लागत असे. त्याचे कारण असे, की दारुची एजन्सी ही नाशिक जिल्ह्यासाठी होती आणि ती सांगलीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याची होती आणि टुरिस्ट टॅक्सिज या ठाणे बेलापूर रोड येथे नोसिल या कंपनीला आणि राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स या थळ-वायशेत येथे वर्षाच्या करारावर दिलेल्या होत्या. त्यामुळे कॉलेज, सांगली, मुंबई, अलिबाग (थळ-वायशेत),मुंबई, नाशिक, आणि परत मुंबईत कॉलेज साठी असं फिरणं होत असे. त्यात सांगली आणि नाशिकला सरकारी विश्रामगृहात रहाण्याची सोय होत असे. या दोहोंपैकी मला सर्वात जास्त सांगलीतल्या मिरज पंढरपूर रस्त्यावरचं मिरज येथील गेस्ट हाऊस जास्त आवडत असे त्यामुळे मी तिथे जायला नेहमीच ऊत्सुक असे. ब्रिटिश काळात म्हणे गव्हर्नर तिथे येऊन हवापालटा करीता रहात असे. त्याकाळी म्हणजे ऐंशीच्या दशकात, हिंदुकॉलनीच्या पहिल्या गल्लीत नॅशनल ट्राव्हल्स म्ह...