Posts

Showing posts from January, 2020

शहरा मधले घर कौलारु

शहरा मधले घरं कौलारु. दादर पश्चिम आणि ते ही शिवाजीपार्क सारख्या मुंबई आणि दादर च्या मध्यवर्ती भागात, पांढरपेशा बुद्धीजीवी लोकवस्तीत रहाण्यासाठी मनाजोगतं घर मिळणं यासाठी कर्माचा भाग जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा गतजन्मीच्या संचिताचा आणि नशीबाचा भाग ही आहे हे नाकारून चालणार नाही. ही जागा अशा मोक्याच्या ठिकाणी आहे कि ईथुन सर्व महत्वाच्या अत्यावश्यक सोयी अगदी सहज चालत जाण्याच्या अंतरावर आहेत. उदाहरणार्थ दोन्ही, मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानके, मुंबईत सर्व ठिकाणी जाता येतील असे बस स्टॉप, चौपाटी, आणि ऊद्याने, सिनेमाघरं, नाट्यग्रुह, भाजीबाजार, नामांकित शाळा, महाविद्यालयं, ईस्पितळं, काय नाही असं नाही. तुम्ही म्हणाल ते ईथे अगदी अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर हजर आहे. अशा या सर्व सोयींनी युक्त दादरच्या शिवाजीपार्क भागात रहाण्याचे भाग्य आम्हाला लाभले. आम्ही, मूळचे कोल्हापूरचे. वडील कोल्हापूर हून सरकारी नोकरी करण्या साठी मुंबई ला आले आणि गिरगावात माधवाश्रमात रहायला लागले. त्यानंतर वडीलांचे लग्न झाल्यावर वडील आणि आई डोंबिवलीत रहायला गेले. सरकारी नोकरी, ती ही मंत्र्यांकडे खाजगी सचिव, अ...

निरागसाचे बोल

निरागसाचे बोल. काल एक मजेशीर प्रसंग ऐकला. आता मजेशीर की काय हे ज्याने त्याने आपापल्या विचारांनी ठरवावे. खरं तर मुलांनी आपापल्या घरा जवळील शाळेत शिकावे अशी आपली माझी एक धारणा. एक तर मूल सोडायला जाणं आणि आणायला जाणं हे सोपं. शिवाय वाहतुक कोंडीतून प्रवास करत थकून भागून शाळेत पोचल्यावर शाळेतलं शिकवणं ग्रहण करण्याची शक्ती किती उरत असेल कुणास ठाऊक. शिवाय कोणत्याही प्रकारची आणीबाणी उद्भवली तर आपलं मूल आपल्याला लागलीच घरी आणता येतं. नाहीतर मूल १०-१२ किमी अंतरावर आणि बाप नोकरीवर. असलेच तर आजी आजोबा घरी अशा त्रिकोणी अवस्थेत कुटुंब असतं. पण तरीही आई बापांचा सोस मोठा असतो. आमुकच शाळेत पोर गेलं पाहिजे ही ईच्छा ऊरी असते. शिवाय घरा जवळच्या शाळेत प्रवेश मिळेलच हे ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे पालक ही निरनिराळ्या शाळांमधे प्रवेशा साठी अर्ज करुन बसतात इंटरव्ह्यू देत. हेतू हा असतो की मिळेल तिथे प्रवेश घ्यायचा आणि नंतर घराजवळच्या ईच्छित शाळेत प्रवेश मिळाला की दूरच्या शाळेचा मिळालेला प्रवेश रद्द करुन मोकळं व्हायचं. बरं या प्रक्रियेत बऱ्याचशा शाळा प्रवेश रद्द केला तरी पैसे परत देत नाहीत हा भाग आणखीन वे...

मकर संक्रांतीच्या निमित्ताने

मकर संक्रांतीच्या निमित्ताने. .... 'लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही.' विश्वासराव आणि सदाशिवराव या दोन मोत्यांसह २७ सरदार आणि सैन्यासह काफिला मारला गेल्याचं हे वर्णन पानिपताच्या युद्धभूमी वरुन थेट पेशव्यांच्या कानावर पडल्यावर त्यांची काय अवस्था झाली असेल? मकर संक्रांतीच्या दिवशी अदमासे २६० वर्षांपूर्वी (१४ जानेवारी चा दिवस होता तो))  पानिपतच्या युद्धात अपरिमित मनुष्यहानी झाली. विश्वासराव आणि सदाशिव भाऊ यांच्यासारखे दोन पाणीदार मोती माळेतून घरंगळले, तब्बल सत्तावीस सुवर्ण मोहरां सारखे सरदार धारातीर्थी पडले, लढवय्ये सैन्य तर चिल्लर खुर्दा उडवावा तसे कामी आले. तोफ गोळे, दारुगोळा, बंदुकीच्या फैरी ईतक्या वापरात आल्या की धरीत्रीनेही या भडीमाराने भाजून निघाल्यामुळे आकांत केला. आकाशात गिधाडांची ईतकी गर्दी झाली की सूर्यकिरणही महत्प्रयासाने धरती पर्यंत पोहोचले असतील. अगणित मानवी प्रेतांचा आणि मुंडक्यांचा त्या रणांगणावर खच पडला होता. माणसांच्या आणि जनावरांच्या रक्तामांसाचा आणि चिखलाचा रेंदा होऊन त्यावर कोल्ही, कुत्री, माश्या, ...